आमच्या बद्दल थोडेसे
विशेष मुलांचा आजन्म सांभाळ करून संस्थेने 'आश्रय - माझे घर' हे नाव सार्थ केले आहे. इतरांप्रमाणेच त्यांनाही सामान्य जीवन जगण्याचा हक्क आहे पण तो त्यांना मिळत नाही. म्हणूनच त्यांचं सुयोग्य पालनपोषण आणि आरोग्यदायी परिसर ह्यावर आम्ही विशेष लक्ष देतो. त्यासाठी विशिष्ट अभ्यासक्रम विकसित करणे हे आम्ही आमचे उद्दिष्ट मानतो. बऱ्याचदा ह्या मुलांच्या कुटुंबाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि पर्यायाने त्यांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो, आणि म्हणूनच ह्या निसर्गाच्या लेकरांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करून जगासमोर आणणे हेच आमच्या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

उपक्रम
विशेष व्यक्तींचे योग्य प्रकारे पालन पोषण त्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी अतिशय महत्वाचे आहे याची आम्हाला जाणीव आहे. अयोग्य जडणघडण त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम करते. आश्रय - माझे घर येथे ह्या प्रौढांचा सर्वांगीण विकास त्यांच्या स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करणे, त्यांची कौशल्ये वाढविणे, विशिष्ट अभ्यासक्रम देणे, मानसिक आरोग्य सेवा पुरविणे ह्या द्वारे केला जातो.
आमचे कार्य
एक संस्था म्हणून 'आश्रय - माझे घर' चा विश्वास आहे की आम्ही जे काही काम करतोय त्याचा सभोवतालच्या परिसरावर नक्कीच परिणाम होतोय. आम्ही त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं स्मित जरी मोजू शकत नसलो तरी एक दिवस त्यांना सन्मानपूर्वक जगासमोर आणू शकू. हे बघा गेल्या २०१८-१९ मध्ये आम्ही केलेल्या कामांपैकी हे काही .....
अभिप्राय
- डॉ. निळकंठ पाटील, जामनेर
-दत्तात्रय शिंदे, बारामती
-विकास चव्हाण, जळगाव
-सतीश चौधरी, कल्याण